Skip to main content

Posts

Showing posts from September, 2026

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव

जिल्हा परिषद, ठाणे *उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव* *ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक उपक्रमांवर भर* ठाणे, दि. ४ सप्टेंबर, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आज, दि. ०४ सप्टेंबर, २०२६ रोजी बी. जे. हायस्कुल येथे  ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील, नगरसेवक ...

ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक

 *ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी;* *सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक* ठाणे,दि.4 सितंबर 2026: ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात झेप घेणारे बदलापूरचे सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली असून, या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.     पुणे येथील 'स्पेसक्रॅट्स विद्यापीठ' संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांमधून टप्प्याटप्प्याने निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत देशभरातून १ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. या खडतर प्रक्रियेतून ठाणे जिल्ह्यातील सोहम स...