महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक जाहीर केला मुंबई, १ एप्रिल २०२५ – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील अद्ययावत आकडेवारीच्या आधारे जिल्हानिहाय सुधारित इष्टांक निश्चित केला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक असुका-२०२५/प्र.क्र.१६/नापु-२८ अन्वये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी १ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू आहे. या अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण व ४५.३४ टक्के शहरी लोकसंख्येची मर्यादा निश्चित करण्यात आली असून एकूण सुमारे ७००.१६ लाख लाभार्थी संख्या ठरवण्यात आली आहे. मागील काही वर्षांत वेळोवेळी इष्टांकात सुधारणा करण्यात आल्या होत्या. तरीही RCMS वर डिजिटाइझ केलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येचे अवलोकन केल्यानंतर अद्याप विनावापर इष्टांक शिल्लक असल्याचे नि...
MERA DESH MERA WATAN SAMACHAR मेरा देश मेरा वतन समाचार