महाराष्ट्र शासन: सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र अनिवार्यपणे दर्शनी भागावर लावावे; पालन न केल्यास कारवाई
महाराष्ट्र शासन: सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र अनिवार्यपणे दर्शनी भागावर लावावे; पालन न केल्यास कारवाई राज्यातील शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी सहज ओळखता यावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा कठोर सूचना दिल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकान्वये सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य केले आहे. शासनाच्या निदर्शनास आले आहे की, ७ मे २०१४ च्या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होत नाही. अनेक अधिकारी-कर्मचारी ओळखपत्र लावत नाहीत किंवा नागरिकांनी विचारणा केली तरी दाखवत नाहीत. यामुळे नागरिकांना अडचणी येतात आणि तक्रारी येतात. नव्या परिपत्रकानुसार: सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर असताना ओळखपत्र स्पष्टपणे दर्शनी भागावर लावावे. प्रवेशाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी ओळखपत्राची काटेकोर तपासणी करावी. ओळखपत्र न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे संबंधित प्रशासकीय विभागांकडे पाठवावीत. संबंधित विभागांनी अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध ...