Skip to main content

Posts

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव

Recent posts

ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक

 *ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी;* *सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक* ठाणे,दि.4 सितंबर 2026: ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात झेप घेणारे बदलापूरचे सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली असून, या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.     पुणे येथील 'स्पेसक्रॅट्स विद्यापीठ' संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांमधून टप्प्याटप्प्याने निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत देशभरातून १ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. या खडतर प्रक्रियेतून ठाणे जिल्ह्यातील सोहम स...

मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!

 *मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी* *विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!* ठाणे,दि.31 अगस्त 2026: १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम - २०२६ जाहीर करण्यात आला असून आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.       या प्रारूप यादीनुसार १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार १३८ मतदार नोंदवले गेले असून यात २३ लाख ५० हजार ७९५ पुरुष, २२ लाख ३९ हजार ६४९ महिला आणि ६९४ इतर मतदारांचा समावेश आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एकूण ६ हजार ८३१ मतदान केंद्रांवर ही प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच पदनिर्देशित ठिकाणी ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे तसेच जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना ही प्रारूप मतदारयादी देण्यात येत आहे.      या मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीबाबतचे आपले दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या नागर...

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर व नेटवर्क ठप, अधिकारी-नागरिक दोनों परेशान

 भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर व नेटवर्क ठप, अधिकारी-नागरिक दोनों परेशान भिवंडी 24 अगस्त 2026 जनहित में विशेष रिपोर्ट भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर और नेटवर्क की लगातार समस्या से पूरा कामकाज ठप पड़ा हुआ है। विभाग में काम करने वाले अधिकारी-कर्मचारी और प्रमाणपत्र बनवाने आए आम नागरिक दोनों ही भारी परेशानी का सामना कर रहे हैं। विभाग में पहुंचने वाले नागरिकों को बार-बार यही जवाब मिल रहा है कि “सर्वर डाउन है” या “नेटवर्क नहीं चल रहा”। जन्म प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, नाम सुधार या पुराने रिकॉर्ड निकालने के लिए आए लोग घंटों कतार में खड़े रहने के बाद भी खाली हाथ लौटने को मजबूर हो रहे हैं।  कई परिवारों को स्कूल एडमिशन, पासपोर्ट, बैंक अधार कार्ड राशन कार्ड पेन कार्ड ड्राइविंग लाइसेंस दिव्यांग लोगों का पेंशन वह अन्य दस्तावेज काम, संपत्ति संबंधी दस्तावेज या अन्य जरूरी कागजात के लिए बार-बार दफ्तर के चक्कर लगाने पड़ रहे हैं। विभाग के कर्मचारियों का भी कहना है कि तकनीकी खराबी के कारण वे नागरिकों की मदद नहीं कर पा रहे। एक क...

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: अग्निवीरांसाठी १ हजार अधिसंख्य पदे, उच्चस्तरीय समिती गठीत!

 महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: अग्निवीरांसाठी १ हजार अधिसंख्य पदे, उच्चस्तरीय समिती गठीत! मुंबई, २८ ऑगस्ट २०२६ सैन्यदलातून अग्निवीर म्हणून चार वर्षांची सेवा पूर्ण करून परतणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त गणवेशधारी गट-क संवर्गात माजी अग्निवीरांना पुनर्नियुक्ती देण्यासाठी एक हजार अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, या पदांवर नियुक्तीची पद्धत निश्चित करण्यासाठी आणि त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग आणि नगरविकास विभाग यांसारख्या विभागांमध्ये ही पदे निर्माण केली जाणार आहेत. यात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह रक्षक, अग्निशामक/बचावकर्ता, गृह रक्षक दलातील पदे, उत्पादन शुल्क जवान व वाहनचालक, वनरक्षक तसेच महापालिका-नगरपालिकांमधील अग्निशामक पदे यांचा समावेश आ...

महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाखांची मदत मंजूर

 महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाखांची मदत मंजूर मुंबई / पुणे | ३० ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जून आणि जुलै २०२६ महिन्यांत अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यात येणार आहे. या निर्णयाअंतर्गत एकूण ₹२३ कोटी ३३ लाख ३१ हजार इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या मदतीचा लाभ १७,२४५ शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ११,२०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ही मदत अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण या चार विभागांतील शेतकऱ्यांना देण्यात येईल. अमरावती विभागाला, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याला यात सर्वाधिक वाटा मिळाला आहे. मदत Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ही मदत रक्कम शेतकऱ्यांच्या जुन्या कर्ज खात्यात किंवा वसुलीसाठी वळती करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना बँकांना याबाबत कडक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आह...

श्रावण पूर्णिमा पर यह पर्व भाई-बहन के पवित्र बंधन का प्रतीक है। बहनें राखी बाँधती हैं और भाई रक्षा का वचन देते हैं।

श्रावण पूर्णिमा तिथि 27 अगस्त 2026 को सुबह लगभग 9:08 बजे शुरू होती है और 28 अगस्त को सुबह लगभग 9:48 बजे समाप्त होती है। भद्रा काल 27 अगस्त को रहता है, इसलिए राखी बांधने का शुभ समय 28 अगस्त की सुबह (उदया तिथि के अनुसार) माना जाता है।  रक्षाबंधन हिंदू धर्म (और जैन धर्म में भी) का एक प्रमुख पर्व है, जो श्रावण मास की पूर्णिमा को मनाया जाता है। इसका अर्थ है “रक्षा का बंधन”। यह मुख्य रूप से भाई-बहन के पवित्र संबंध, स्नेह, विश्वास और रक्षा के वचन का प्रतीक है। बहन भाई की कलाई पर राखी (रक्षासूत्र) बांधती है और भाई उसकी रक्षा का वचन देता है। धार्मिक और वैदिक मान्यताएं वैदिक साहित्य में रक्षासूत्र का उल्लेख शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक सुरक्षा से जुड़ा है। अथर्ववेद में रक्षा सूत्र का वर्णन मिलता है। प्राचीन काल में ब्राह्मण यजमानों, राजाओं या गुरु शिष्यों को रक्षासूत्र बांधते थे। यह केवल भाई-बहन तक सीमित नहीं था; पत्नी-पति, गुरु-शिष्य आदि संबंधों में भी बांधा जाता था। रक्षासूत्र बांधते समय प्रचलित मंत्र है: “येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥” (अर्था...