जिल्हा परिषद, ठाणे येथे ‘सेवा संकल्प अभियानासह मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा’ शुभारंभ शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन
जिल्हा परिषद, ठाणे *जिल्हा परिषद, ठाणे येथे ‘सेवा संकल्प अभियानासह मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा’ शुभारंभ* *शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन* ठाणे, दि. १७ सप्टेंबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणेच्या सभागृहात आज, दि. १७ सप्टेंबर, २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. शासनाच्या विविध योजना व सेवा अधिक प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांमध्ये समन्वय वाढविणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी ‘सेवा संकल्प अभियानास’ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “हे अभियान प्रभावी आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग नोंदवावा. शासकीय योजना व सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही आ...