Skip to main content

हर हर महादेव..!! बम बम भोले..!!

 हर हर महादेव..!!         बम बम भोले..!!





कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या भव्य कावड यात्रेत आज सहभागी होण्याचा आणि या अभूतपूर्व भक्तिसागराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग आला. हजारो शिवभक्तांच्या श्रद्धेने, उत्साहाने आणि ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने यात्रा मार्ग अक्षरशः शिवमय झाला.


खांद्यावर कावड, हातात भगवा ध्वज, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि ओठांवर महादेवाचे नामस्मरण... डोळ्यांसमोर दिसणारा हा अथांग शिवभक्तांचा जनसागर पाहून मन अक्षरशः भारावून गेले. ढोल-ताशांचा निनाद, डौलाने फडकणारे भगवा ध्वज, आणि प्रत्येक पावलागणिक घुमणारा ‘हर हर महादेव’चा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.


या भव्य यात्रेच्या आयोजनामागे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संतोष बांगर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमची अथक मेहनत आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सुरू असलेली ही परंपरा आज केवळ एक धार्मिक कार्यक्रम राहिलेली नसून हिंगोली आणि संपूर्ण मराठवाड्याच्या धार्मिक-सामाजिक जीवनातील एक भव्य उत्सव बनली आहे. वर्षानुवर्षे ही परंपरा अधिक व्यापक होत असून हजारो शिवभक्तांना एका भक्तीच्या धाग्यात जोडण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होत आहे.


आजची प्रचंड गर्दी ही केवळ गर्दी नव्हती; ती संतोष बांगर साहेबांनी अनेक वर्षांत कमावलेल्या लोकविश्वासाची पावती होती. त्यांच्या पुढाकारातून उभी राहिलेली ही भक्तीची चळवळ आणि त्याला मिळालेला अभूतपूर्व लोकसहभाग निश्चितच कौतुकास्पद आहे. कावड खांद्यावर घेऊन चालणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावर श्रद्धेचे तेज आणि मनात भोलेनाथाविषयीची भक्ती अनुभवायला मिळत होती. ‘हर हर महादेव’चा जयघोष प्रत्येक पावलाला नवी ऊर्जा देत होता. या वातावरणात उभी राहिलेली भक्तीची ही लाट मनाला स्पर्शून गेली.


या भव्य यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष बांगर साहेब, त्यांचे सहकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, सेवाभावी मंडळी आणि यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन.


आज हिंगोलीच्या भूमीतून घुमलेला ‘हर हर महादेव’चा हा जयघोष केवळ कळमनुरीपासून हिंगोलीपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात घुमत राहो, हीच भगवान भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना. प्रत्येक शिवभक्ताच्या मनोकामना पूर्ण होवोत, प्रत्येकाच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो आणि हिंगोलीसह संपूर्ण महाराष्ट्रावर महादेवाची कृपादृष्टी सदैव राहो. 


यावेळी शिवसेनेचे सर्व स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.🙏




















काही उत्सव केवळ साजरे केले जात नाहीत, तर ते समाजाला एकत्र आणतात, आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडतात. हिंगोलीत आज कावड यात्रेच्या माध्यमातून अनुभवायला मिळालेला हा उत्साह आणि भक्तिमय वातावरण त्यापैकीच एक होते.



भव्य कावड यात्रेनंतर हिंगोली येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थित राहून शिवभक्त आणि नागरिकांशी संवाद साधला. हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, भक्तीने भारलेले वातावरण आणि विशेषतः मोठ्या संख्येने सहभागी झालेली युवा शक्ती हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. आपल्या श्रद्धेसाठी, आपल्या परंपरांसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणारा हा जनसागर निश्चितच प्रेरणादायी आहे.


आजच्या या उत्सवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपली संस्कृती आणि आपल्या धार्मिक परंपरा आजची पिढीही तितक्याच अभिमानाने पुढे घेऊन जात आहे. काळ बदलत असला, आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत असला तरी आपल्या परंपरांशी असलेली नाळ आजही घट्ट आहे. आपल्या सण-उत्सवांच्या माध्यमातून हीच नाळ अधिक मजबूत होते आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते.


अशा उत्सवांमधून केवळ धार्मिक भावना व्यक्त होत नाहीत, तर समाजातील विविध घटक एकत्र येतात, परस्परांमध्ये आपुलकी निर्माण होते आणि सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे आपल्या श्रद्धा, परंपरा आणि संस्कृती जपणारे असे उपक्रम सातत्याने होत राहणे ही काळाची गरज आहे. इतक्या मोठ्या स्वरूपात हा उत्सव सातत्याने आयोजित करून हजारो शिवभक्तांना एका भक्तीच्या धाग्यात जोडण्याचे काम केल्याबद्दल आमदार श्री. संतोष बांगर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या उत्सवामागे असलेले नियोजन, मेहनत आणि सातत्य निश्चितच कौतुकास्पद आहे. ही परंपरा यापुढेही अशीच उत्साहाने सुरू राहावी, दरवर्षी तिचे स्वरूप अधिक व्यापक व्हावे आणि हिंगोलीच्या या भव्य धार्मिक उत्सवाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आजच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवा बांधवांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी दौऱ्या दरम्यान महिला भगिनींनी नांदेड विमानतळावर राखी बांधून अगदी उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.




















यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार, संपर्कप्रमुख आनंद तिडके, बाबुराव कदम, बालाजी कल्याणकर, सईद खान, साहेबराव कांबळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.🙏

ॐ नमः शिवाय..! 



आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून श्रद्धेने पूजल्या जाणाऱ्या या पवित्र तीर्थक्षेत्री येऊन महादेवाच्या चरणी नतमस्तक होण्याचा अनुभव अत्यंत समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला. 


सर्व नागरिकांना सुख, शांती, समृद्धी लाभावी; प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद नांदावा आणि आपल्या महाराष्ट्रावर सदैव भगवान भोलेनाथाची कृपादृष्टी राहावी, अशी प्रार्थना केली.











यावेळी स्थानिक मंत्री महोदय, खासदार, आमदार, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.🙏

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 


              मेरा देश मेरा वतन समाचार 




                    🙏 पत्र के🙏




          संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी




नोट........ 👉🙏




 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏


जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏







Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

तेली समाज के गौरव, राष्ट्र के गौरव, दानवीर भामाशाह जी की जयंती पर कोटि-कोटि नमन! 🙏

 भामाशाह (1547–1600) भारतीय इतिहास के एक महान दानवीर, सेनापति, मंत्री और महाराणा प्रताप के विश्वासपात्र सहयोगी थे। वे मेवाड़ राज्य (राजस्थान) के उद्धार और स्वाभिमान की रक्षा में अपनी पूरी संपत्ति समर्पित करने के लिए प्रसिद्ध हैं।  जन्म और पृष्ठभूमि जन्म: 28 जून 1547 (कुछ स्रोतों में 29 अप्रैल 1547) को मेवाड़ राज्य में, वर्तमान पाली जिले के सादड़ी गांव या चित्तौड़गढ़ क्षेत्र में। परिवार: पिता — भारमल कावड़िया (रणथम्भौर दुर्ग के किलेदार, राणा सांगा द्वारा नियुक्त; बाद में राणा उदय सिंह के प्रधानमंत्री)। माता — कर्पूरदेवी। वे ओसवाल जैन समुदाय (कावड़िया/कांवड़िया गोत्र) से थे और जैन धर्म के अनुयायी थे। उनके पिता की वजह से बाल्यकाल से ही मेवाड़ के शासकों से निकट संबंध था। महाराणा प्रताप के साथ योगदान भामाशाह महाराणा प्रताप के बचपन के मित्र, सलाहकार और सेनापति थे। हल्दीघाटी के युद्ध (1576) के बाद मेवाड़ की स्थिति बहुत खराब हो गई थी — सेना बिखरी हुई थी, संसाधन खत्म हो चुके थे और महाराणा प्रताप परिवार सहित जंगलों-पहाड़ियों में भटक रहे थे। इस कठिन समय में भामाशाह ने अपनी सारी व्यक्तिगत...