महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: अग्निवीरांसाठी १ हजार अधिसंख्य पदे, उच्चस्तरीय समिती गठीत! मुंबई, २८ ऑगस्ट २०२६ सैन्यदलातून अग्निवीर म्हणून चार वर्षांची सेवा पूर्ण करून परतणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त गणवेशधारी गट-क संवर्गात माजी अग्निवीरांना पुनर्नियुक्ती देण्यासाठी एक हजार अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, या पदांवर नियुक्तीची पद्धत निश्चित करण्यासाठी आणि त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग आणि नगरविकास विभाग यांसारख्या विभागांमध्ये ही पदे निर्माण केली जाणार आहेत. यात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह रक्षक, अग्निशामक/बचावकर्ता, गृह रक्षक दलातील पदे, उत्पादन शुल्क जवान व वाहनचालक, वनरक्षक तसेच महापालिका-नगरपालिकांमधील अग्निशामक पदे यांचा समावेश आ...
MERA DESH MERA WATAN SAMACHAR मेरा देश मेरा वतन समाचार