*भिवंडीत रेती माफियांवर प्रशासनाची मोठी कारवाई; ९० लाखांचा मुद्देमाल नष्ट* *ठाणे, दिनांक 20 मार्च 2026:-* जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील केवणी रेती बंदर परिसरात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाने शुक्रवारी (२० मार्च २०२६) मोठी कारवाई केली. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अभिजीत खोले यांनी ही धडक मोहीम राबवली. या कारवाईत ५ सेक्शन आणि ८ बार्जसह सुमारे ८० ते ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जाळून व पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केवणी खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उपसा सुरू होता. याची गांभीर्याने दखल घेत तहसिलदार अभिजीत खोले यांनी पथक तयार करून धाड टाकली.खाडीतून चोरून आणलेली रेती साठवण्यासाठी माफियांनी खाडीकिनारी १२ मोठ्या कुंड्या तयार केल्या होत्या. या कुंड्या ३ जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर हे साठे करण्यात आले होते, ती जमीन (सर्वे न...